फसवी माघार – india-china at ladakh border
भारत आणि चीन यांच्यात लडाख येथे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) गेल्या नऊ महिन्यांपासून असलेला तणाव कायम असला, तरी कडाक्याच्या थंडीमुळे तो काहीसा निवळत असल्याचे दिसते. पूर्व लडाखमध्ये एप्रिल-मेपासून सुमारे ५० हजार सैन्य तैनात केलेल्या चीनने, दहा हजार सैनिकांना माघारी नेले आहे. भारतानेही सैन्यमाघारीची कृती केली आहे. या काळात लडाख परिसरात हिवाळा अतिशय कडक असतो आणि तापमान किती तरी अंशांनी शून्याच्या खाली जाते. अशा स्थितीत उंचावरील या ठिकाणी मोठ्या संख्येने सैन्य तैनात ठेवणे अवघडच असते; त्यामुळे आघाडीचे सैन्य कायम ठेवून उर्वरित तुकड्या मागे नेण्याचे पाऊल उचलले जात आहे. याचा अर्थ चीन माघार घेत आहे, असा नाही.