जर बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप केला तर आरोग्य व्यवस्था आणि इतर जीवनावश्यक बाबींवर परिणाम होऊ नये म्हणून सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे.
मुंबई 16 मे : मुंबईत कोरोनाचा उद्रेक असतानाच बेस्ट कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिला आहे. अनेक बेस्ट कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झालीय तर काही कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी घ्या अन्यथा संप करू असा इशारा कर्मचारी संघटनेने दिला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्यभरातून तब्बल 1000 बसेस मुंबईत मागविण्यात आल्या आहेत.
जर बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप केला तर आरोग्य व्यवस्था आणि इतर जीवनावश्यक बाबींवर परिणाम होऊ नये म्हणून सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे. सोमवार पासून संप करण्याची बेस्ट वर्कर्स युनियनची हाक दिलीय तर संप मोडून काढण्याच्या पवित्र्यात सरकार असून त्यांनी तशी तयारीही केली आहे.
राज्याची राजधानी असलेली मुंबई कोरोनाचा हॉटस्पॉट ठरली आहे. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपल्यानंतरही मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईतील धारावीसारख्या झोपडपट्टीमध्ये या व्हायरसने मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे. त्यामुळे मुंबईमध्ये कोरोनाचा विस्फोट होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. मात्र अशा स्थितीतच मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी मुंबईकरांना धीर देत एक आवाहन केलं आहे.
वाईनमुळे सुखावणार महाराष्ट्रातला शेतकरी, सरकारने घेतला मोठा निर्णय
‘मुंबईकराना विनंती आहे की आपण एवढी दिवस मेहनत घेतली आहे. आता आणखी काही दिवस घरी राहा. हा लढा अंतिम टप्प्यात आहे. आपल्याला नक्की यश मिळेल,’ असं सांगत इकबाल चहल यांनी मुंबईतील नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे.
Lockdown मध्ये रुग्णालयाने डॉक्टरला काढून टाकलं, निषेधार्थ सुरू केला चहाचा गाडा
महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी आज सायन रुग्णालयाची पाहणी केली. ‘हे रुग्णालय आमच्यासाठी महत्वाचं आहे. येथील आयसीयू , कोव्हिड वॉर्डचीही त्यांनी केली. तसंच यावेळी चहल यांनी थेट रुग्ण, आरोग्य सेवक यांच्या अडचणी जाणून घेत धीर दिला.
First Published: May 17, 2020 06:30 PM IST