राज्यात आज ११९६ करोना रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १४ हजार ६०० एवढी झाली आहे. त्यामुळे राज्यात ३३ हजार ९८८ करोना रुग्ण अद्याप उपचार घेत आहेत. आज दगावलेल्या रुग्णांमध्ये मुंबईत ३९, पुण्यात ६, सोलापूर ६, औरंगाबाद ४, लातूर, मीरा भाईंदर आणि ठाण्यातील प्रत्येकी एकाचा समाववेश आहे. मृतांमध्ये ३४ पुरूष आणि २४ महिलांचा समावेश आहे.
उद्यापासून मुंबईतूनही विमानसेवा सुरू; रोज २५ विमानांचे उड्डाण
मुंबईतील करोना रुग्णांची संख्या ३० हजार ५४२ असून मृतांची एकूण संख्या ९८८ झाली आहे. ठाण्यात आतापर्यंत ४२० रुग्णांची नोंद झाली असून ४जण दगावले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात २५९० रुग्णांची नोंद झाली असून ३६ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. नवी मुंबईमध्येही करोनाबाधितांची संख्या २ हजार ७ झाली असून मृतांची संख्या २९ झाली आहे. कल्याण-डोंबिवलीतील करोना रुग्णांची संख्या ८८९ झाली असून मृतांचा आकडा ७वर गेला असून उल्हासनगरमधील करोना रुग्णांची संख्या १६९वर गेली असून तीन जण दगावले आहेत.
राज्यात १४ हजार ६०० रुग्णांना बरे करून घरी सोडण्यात आले आहे. तसेच राज्यात ४ लाख ९९ हजार ३८७ लोकांना होम क्वॉरंटाइन करण्यात आले असून ३५ हजार १०७ संस्थात्मक क्वॉरंटाइन करण्यात आलं आहे.
Live: राज्यात ३०४१ नवे करोनाबाधित सापडले; ५८ रुग्णांचा मृत्यू