‘रुग्णालयांबाहेर झालेल्या करोना रुग्णांचे मृत्यू अद्यापही दाखवण्यात आलेले नाहीत. या मृत्यूंच्या बाबतीत वॉर्ड अधिकाऱ्यांनी मृत्यू प्रमाणपत्र दिलेलं असूनही या रुग्णांचा आकडा अजूनही जाहीर करण्यात आलेला नाहीये. आकडेवारीची अचूकता हाच करोनाविरोधातील लढाईसाठी मुख्य आधार असल्यानं याकडे लक्ष,’ देण्याची मागणीही देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.
वाचाः आशा सेविकांच्या मानधनात वाढ; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
‘प्राथमिक संकलनातच आतापर्यंत किमान ४५० मृत्यू ओळखण्यात आलेले आहेत. एकूणच मृत्यूच्या संख्येत एकतर त्याचदिवशी किंवा ७२ तासांत तशी नोंद होणे आवश्यक आहे. परंतू तीन महिने लोटले तरी मृत्यू रिपोर्ट न होता आणि ते लक्षात आल्यानंतर सुद्धा एकदम संख्या दिसू नये, या भीतीने रोज थोडे-थोडे करून ते मृत्यूसंख्येत अधिक करणे, ही अतिशय चुकीची रणनीती आहे.’ असंही त्यांनी म्हटलं आहे.
वाचाः राज्यात २८ जूनपासून पुन्हा सलून सुरू होणार, फक्त केसच कापणार!
‘करोनाविरूद्धच्या लढाईत कोणत्या आठवड्यात किती मृत्यू झाले, किती रूग्णसंख्या आढळली, संसर्ग (इन्फेक्शन) किती प्रमाणात झाले आहे, हे कळण्यासाठी आकडेवारी हा अतिशय महत्त्वपूर्ण स्त्रोत आहे. अचूक विश्लेषणाचा तो महत्त्वपूर्ण आधार आहे. या विश्लेषणातूनच आणि रणनीती आखून त्याला पायबंद घालणे शक्य आहे. त्यामुळे नोंदी अचूक ठेवण्याचा आग्रह सातत्याने असला पाहिजे. त्यामुळं ही विलंबाची पद्धत बंद करून अचूक आकडेवारी हाती येईल आणि त्याचे तत्काळ रिपोर्टिंग होईल, याचा आग्रह आपण धरला पाहिजे. त्यादिशेने योग्य त्या सूचना आपण संबंधितांना द्याल,’ असेही या पत्रात म्हटले आहे.