वाचा- लॉकडाऊनमध्ये क्रिकेटपटूंना सतर्कतेचा इशारा
चोर समजून जमावाने मॉब लिंचिंगच्या घटनेवर अनेक जण संताप व्यक्त करत आहेत. चोर असल्याच्या संशयावरून संबंधीत साधूंना मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी सर्व आरोपींनी अटक केली आहे. पण अद्याप सोशल मीडियावरून या घटनेबद्दल आक्रोश व्यक्त केला जात आहे. भाजपच्या नेत्यांनी आणि अन्य साधू संतांनी महाराष्ट्र सरकारला या संदर्भात त्वरीत कारवाईची मागणी केली आहे.
वाचा- लॉकडाऊनमध्ये विराट कोहलीने दिलं चॅलेंज
भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण याने देखील या घटनेवर ट्विट केले आहे. पालघर मॉब लिंचिंगचे फोटो पाहिल्यानंतर प्रचंड दु:ख झाले. ही चित्र भयानक आणि लज्जास्पद असल्याचे इरफान पठाणने म्हटले आहे.
So hurtful to see the images of #PalgharMobLynching terrible and barbaric act. #Shame
— Irfan Pathan (@IrfanPathan) 1587324593000
पालघरमधील गडचिनचले गावात दोन साधूंना मारहाण करत त्यांची हत्या करण्यात आली होती. धक्कादायक म्हणजे ही मारहाण होत असताना तिथे काही पोलिस कर्मचारी उपस्थित होते. जमावाने एका चालकासह पोलिसांवर देखील हल्ला केला होता. नंतर संबंधीत साधूंना रुग्णालयात नेण्यात आले पण त्यांना मृत घोषित करण्यात आले.
वाचा- ‘धोनीचे भवितव्य या व्यक्तीच्या हातात’
याआधी देखील इरफानने एक ट्विट केले होते. जर धर्म हा मुद्दा मागे ठेवला तर आपल्या सर्वांसाठी सर्वात मोठा मुद्दा काय असेल. मला वाटते रोजगार, विकास, क्रीडा, चित्रपट, दान, आयुष्य, देशाला अव्वल करणे, सन्मान आणि मूल्य.
Suppose,the #religion topic takes a back seat.What would be the most interesting topic to talk about then? May be… https://t.co/yGyZ8X3vHU
— Irfan Pathan (@IrfanPathan) 1587293103000
इरफानच्या या ट्विटवर अनेकांनी त्याला ट्रोल देखील केले होते. तो अन्य मुद्द्यांवर का बोलत नाही अशी टीका युझर्सनी केली होती.