मुंबईवरील बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबई पोलिसांनी ४ नोव्हेंबर १९९४ रोजी १० हजार पानांचं आरोपपत्र दाखल केलं होतं. याप्रकरणाची २२ वर्ष टाडा कोर्टात सुनावणी चालली. ६०० लोकांची साक्ष घेण्यात आली होती. याप्रकरणी २००६ मध्ये कोर्टाने याकूब मेमन आणि अभिनेता संजय दत्तसह १०० आरोपींना दोषी ठरवलं होतं. तर २३आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. याप्रकरणात आतापर्यंत १४ दोषींना फाशी ठोठावण्यात आली आहे. यात २०१५मध्ये याकूब मेमनला फाशी दिली गेली आहे. तर अबू सालेमसह २२ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी अभिनेता संजय दत्तनेही शिक्षा भोगली आहे.
करोनाची लस येण्याआधीच बिल गेट्स यांचं चिंता वाढवणारं वक्तव्य
मोदींनी अप्रत्यक्षपणे साधला ‘या’ काँग्रेस नेत्यावर निशाणा; म्हणाले…
यातील एक आरोपी अब्दुल कय्यूमला जून २०१७मध्ये मुक्त करण्यात आलं होतं. सध्या या प्रकरणातील आरोपी टायगर मेमन आणि दाऊद इब्राहिमसह २७ आरोपी फरार आहेत.
रामदेव बाबांच्या ‘कोरोनिल’ला साडेसाती; विक्री किंवा जाहिरात केल्यास गुन्हा दाखल होणार