आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून हा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालघरच्या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. साधूंवर हल्ला करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली असल्याचं मी सर्व राजकीय पक्षांच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. या गुन्हेगारांना कठोर शिक्षा दिली जाईल. महाराष्ट्र सरकार अशा प्रकारच्या घटना खपवून घेणार नाही, असं आदित्य यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
पालघर येथे शुक्रवारी मध्यरात्री नाशिककडे जात असताना सुमारे शंभर जणांच्या जमावांनी चोर समजून दोन साधू आणि त्यांच्या वाहनचालकावर हल्ला केला होता. या हल्ल्यात या तिघांचाही मृत्यू झाला. मॉब लिंचिंगच्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून त्यावरून राजकारणही रंगले आहे. याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची आणि या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालघर घटनेप्रकरणी तात्काळ कारवाई करण्यात आल्याचं स्पष्ट केलं आहे. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली असून आरोपींना सोडणार नाही. त्यांना कठोरातील कठोर शिक्षा दिली जाईल, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मास्क आणि लॉकडाऊन भंगाचे गुन्हे वाढले
CM has made a statement on the Palghar crime. I urge all, especially political parties to kindly note that the poli… https://t.co/zrsBj5usDX
— Aaditya Thackeray (@AUThackeray) 1587317106000