वाचा- AUS vs IND 4th Test day 3: भारताच्या शेपटाने ऑस्ट्रेलियाला रडवले, सुंदर-ठाकूर यांची विक्रमी…
तिसऱ्या दिवशी ठाकूर फलंदाजीला आला तेव्हा भारताची अवस्था ६ बाद १८६ अशी होती. भारताचे तळातील फलंदाज फार तर ५० धावा करू शकतील असे वाटले होते. पण सुंदर आणि ठाकूर यांच्या मनात काही वेगळेच होते. या दोघांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना विकेट दिलीच नाही पण त्यांची धुलाई देखील केली. सुंदर आणि ठाकूर यांनी सातव्या विकेटसाठी १२३ धावांची भागिदारी केली. ठाकूर आणि सुंदर यांनी कसोटीतील पहिले अर्धशतक झळकावले. सुंदरचे पदार्पणातील अर्धशतक ठरले. ठाकूरने ११५ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांसह ६२ तर सुंदरने ११५ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकारासह ६७ धावा केल्या. भारताचा पहिला डाव ३३६ धावांवर संपुष्ठात आला.
वाचा- पिचमुळे नव्हे तर ही आहे खरी गुणतवत्ता; सचिनने व्हिडिओ शेअर करून केले भारतीय गोलंदाजाचे कौतुक
भारताच्या या दोन्ही फलंदाजांचे कौतुक कर्णधार विराट कोहली (virat kohli)ने केले आहे. सोशल मीडियावर विराटने सुंदर आणि ठाकूर यांनी शानदार फलंदाजी केली. या दोघांनी कसोटी क्रिकेट काय आहे हे दाखवून दिल्याचे विराटने म्हटले. सुंदरचे अप्रितम पदार्पण ठरले तर शादुर्लचे कौतुक करताना ‘तुला परत मानले रे ठाकरू! असे विराटने म्हटले आहे.
वाचा- रैनाची शानदार गोलंदाजी; विकेट नव्हे तर रनआउट केले, पाहा व्हिडिओ
वाचा- गोलंदाजांमध्ये अशी कामगिरी करणारा जगातील एकमेव खेळाडू; पाहा व्हिडिओ
विराटचे हे ट्विट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.